आंतरजातीय विवाह योजना
तपशिल
या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील जातीय भेदभाव दुर करून एकात्मिकतेची भावना रूजविणे. या करीताच केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय विवाह करणारा जोडप्याला राज्य शासन रू.25000 व केंद्र शासन रू.25000 असे एकुण 50000 प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. समाज कल्याण विभागास अर्ज करावा. अर्ज स्वच्छ अक्षरात भरून अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती क्रमाने जोडाव्यात.
- विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर वर व वधु यांचा एकत्रित फोटो चिकटवावा (लहान आकाराचा)
- सक्षम अधिकाऱ्याकडील विवाह नोंदणी दाखला
- वर व वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले
- वर अथवा वधु मागासवर्गीय असल्यास उप विभागीय दंडाधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला
- जातीचा दाखला देणे आवश्यक आहे
- वर व वधु यांचा मा. जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांनी दिलेला 15 वर्ष वास्तव्याचा दाखला (डोमेसाईल)
- स्टॅम्प पेपरवर सत्य प्रतिज्ञापत्र (मूळ प्रत) जोडावे
- या अगोदर आम्ही कोठेही या योजनेचा लाभ घेतलेला नाही
- आम्ही सुखाने नांदत आहोत
- वर व वधु यांचे प्रत्येकी दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून अर्थसहाय्य मिळण्याचे शिफारस पत्र (मूळ प्रत) जोडावी
- रेशन कार्ड छायांकित प्रत (वर व वधु यांच्या नावाची नोंद असणे आवश्यक आहे)
- वर व वधु यांच्या एकत्रित बँक खाते पासबुकची छायांकित प्रत (राष्ट्रीयकृत बँक असणे आवश्यक आहे)
- वर व वधुचे आधार कार्ड
लाभार्थी:
विवाह करणाऱ्यापैकी एक अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केलेले जोडपे पात्र.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. समाज कल्याण विभागास अर्ज करावा. अर्ज स्वच्छ अक्षरात भरून अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती क्रमाने जोडाव्यात.