बंद

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

    जिल्हा परिषद,अकोला अंतर्गत सन १९९८ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागांतर्गत अकोला,मुर्तीजापूर,बर्शिटाकळी,पातुर,बाळापुर,अकोट,तेल्हारा, हे ७ उपविभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व देखभाल दुरुस्ती (यांत्रिकी ) कार्यरत आहेत. सदर यंत्रणे मार्फत ग्रामीण भागात पिण्याचा पाण्याचा विविध उपाय योजना करण्यात येतात. पाणी टंचाई निवारणार्थ उपयोजना करणे,नवीन विंधन विहीर व कृपनलिका हातपंप इत्यादी कामाची देखभाल व दुरुस्ती करणे तसेच जिल्हा परिषद कडे हस्तांतरित झालेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा चालवण्यात येतात. ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग राज्य आणि केंद्र सरकारसोबत काम करतो.

    जबाबदाऱ्या:

    1. स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, अंदाज आणि अंमलबजावणी.
    2. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची देखभाल करणे.
    3. पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या गरजा पूर्ण करतात याची खात्री करणे.
    4. पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा अहवाल देणे.

    जिल्ह्यातील सर्व ग्रामीण समुदायांसाठी शाश्वत व शुद्ध पिण्याचे पाणी आणि कार्यक्षम पाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांद्वारे जीवनमान सुधारणे.

    ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन २००९-२०१० पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर  राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन पुर्नरचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. या नुसार ग्रामीण भागातील कुटुबांना सन २०२४ पर्यंत “हर घर जल” (एफएचटीसी- फंक्शनल हाउस होल्ड टॅप कनेक्शन) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहेत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्ता पाणी पुरवठा करणे हे, जल जीवन मिशनचे प्रमुख उददीष्ट आहे.

    ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील महत्त्वाची कामे

    • जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करणे.
    • पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित करणे तसेच पुढील काळात पाणी टंचाई भासू नये याकरिता प्रतिबंधक उपाययोजना प्रस्तावित करणे.
    • राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे.
    • राज्यातील ग्रामीण भागात(गावे/वाडया/वस्त्या) पाणी पुरवठा योजना राबविणे.

    

    • कार्यकारी अभियंता(विभाग प्रमुख)
    • उपकार्यकारी अभियंता
    • सहाय्यक प्रशासन अधिकारी
    • वरिष्ठ सहायक
    • कनिष्ठ सहायक
    • कनिष्ठ अभियंता
    • लेखाधिकारी
    • शिपाई